HW News Marathi
महाराष्ट्र

डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थानापन्न होईल !

नवी दिल्ली | “डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेले दिसेल,” असा ठाम विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी पाच वर्ष सरकार चलविण्याची भूमिका स्पष्ट झाल्याची माहिती राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत यांनी आज (२१ नोव्हेंबर) सकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर सकारात्मक चर्चा झाली असून दोन दिवसात सत्तास्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाली आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल असेही राऊत यांनी या वेळी सांगितले. दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

आता दिल्ली विषेश काम नाही, त्यामुळे मुंबईहून दिल्लली आलेल्या आपल्या मित्रांनी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे राऊतांनी सांगितले. राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्म एकत्र घेऊन राज्याची स्थापना केली. शिवसेनेला कोणीही सेक्युलरिजम शिकवू नये, असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. न्यायालयात धर्माच्या पुस्तकाऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घ्या, असे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशातील पहिले नेते, असे सांगत राऊत यांनी बाळासाहेबांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा पुरस्कार केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’, राष्ट्रवादीकडून अण्णा हजारेंना सवाल

News Desk

आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत!

News Desk

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार!

News Desk