HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावणार-उद्धव ठाकरे

मुंबई : आमचं हिंदुत्त्व तुमच्यासारखं थोतांड नाही. गाईला जपायचं अन् ताईला फोडायचं, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टिकास्र सोडले. दसरा मेळाव्यातील भाषणात ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली. नोटाबंदी, जीएसटी, काश्मीर प्रश्न, बुलेट ट्रेन, हिंदुत्त्व इत्यादी मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला केला.

मुंबईत शिवतीर्थावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील कालच्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी भाषणाआधी हार स्वीकारले नाहीत. त्यांनी थेट भाषणाला सुरुवात केली आणि भाजपला धारेवर धरले. नोटबंदीचा निर्णय घेऊन देशाचे नुकसान करणारे देशद्रोही नाहीत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तर पाकिस्तानप्रमाणे ४० ते ४५ रुपयांत पेट्रोल विकले तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचू, असा टोमणा देखील उद्धव ठाकरेंनी मारला.

आम्हाला शेंडी, जानव्याचे हिंदुत्त्व मान्य नाही. आम्हाला मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्त्व मान्य नाही. आमचं हिंदुत्त्व देशाशी निगडीत आहे. आम्ही सावरकारांचे हिंदूत्व मानतो. भाजपने आपली हिंदूत्वाची व्याख्या स्पष्ट करावी, असेही उद्धव यांनी यावेळी म्हटले आहे.

बुलेट ट्रेनला विरोध

कुणी मागितली बुलेट ट्रेन? मग हा सगळा खटाटोप कोणासाठी? तमाम माता-भगिनींच्या स्वप्नांचा चुराडा करून तुम्ही चांगली स्वप्न बघता. फुकट नागोबा कशाला हा? हे सगळं फुकट मिळतं म्हणून हे चाळे सुरू आहेत. ज्या जनतेने निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनचा विरोध केला.

उद्धव ठाकरे यांच्या सर्व भाषणात केवळ केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करण्यात आले. परंतु राज्यसरकारमधून बाहेर पडण्याबाबत त्यांनी काहीही बोलणे टाळले. योग्य वेळ आल्यानंतर सत्तेतून बाहरे पडण्याबाबत विचार करू, असा काहीसा सूर त्यांच्या भाषणातून जाणवत होता.

राज्यातील बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न, महागाई आदी मुद्दायवर यापुढे आवाज उठवत राहणारच असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे सत्तेत आहेत. परंतु ते विरोधकांची भूमिका निभावत आहेत. सत्तेचा मोह त्यांना काही केल्या सुटत नाही. परंतु ते ज्या सत्ताधाºयावर टीका करत आहेत. त्यांच्यासोबत उद्धव यांची सत्तेत युती आहे. म्हणजे भाजपसाठी जो नियम लागतो तोच शिवसेनाला लागू पडतो. भाजपचा प्रभाव वाढू नये, यासाठी ते वारंवार या पक्षावर टीका करत आहेत. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करून दाखवा, असे आवाहनही त्यांनी या वेळी दिले. ते याच भीतीपायी असावे. भाजपने हिंदूत्वाची व्याख्या स्पष्ट करावी, असे जरी उद्धव म्हणत असले तरी त्यांची युती केवळ हिंदूत्व या शब्दामुळे आहे. शिवसेना सत्तेत राहून भाजपच्या हिंदूत्वाला एक प्रकारे मान्यताच देत आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण गोंधळलेले वाटत होते. त्यात ठोस अशी काहीच भूमिका दिसून आली नाही.

सत्तेतून बाहेर पडण्याबाबत ते काहीतरी घोषणा करतील किंवा तसा तडकाफडकी निर्णय घेतील, असे काही जाणकारांना वाटत होते. परंतु त्यांनी तसे न करता, सत्ता कशी चालवायची याचा सल्ला देऊन आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचेही स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांविरोधात २३ जुलैला सर्वोच्च न्यायालय देणार अंतिम निकाल

News Desk

‘एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा’-आदित्य ठाकरे

News Desk

मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश केल्यास कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत – विनोद पाटील

News Desk