HW News Marathi
महाराष्ट्र

“मुंबई-गोवा हायवेवर काळे फासणारे, चिखलफेक करणारे तुमच्याबरोबर, शिवसेनेचा नितीन गडकरींवर हल्लाबोल!

नवी दिल्ली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल अत्यंत स्फोटक पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी “मुंबई-गोवा रोड आम्ही करतोय का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्या बरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का?” असा सवाल शिवसेनेचा अरविंद सावंत यांनी नितीन गडकरींना केला आहे.

रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे, असा सूर त्या पत्रातून

“माननीय नितीन गडकरी यांचा पूर्ण आदर आहे, पण त्यांनी शिवसेना शब्द वापरण्याऐवजी त्या एका विशिष्ट भागाचा उल्लेख केला असता, तर बरं झालं असतं. पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केला. जणू काही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे, असा सूर त्या पत्रातून व्यक्त होतोय, ते गैर आहे असं मला वाटते.” असं अरविंद सावंत म्हणाले.

मुंबई गोवा महामार्गाची आज काय अवस्था आहे ते पाहा

“अखंड शिवसेनेबद्दल असं विधान करणे अयोग्य आहे. कारण काही माणसे आज गडकरींसोबत आहेत, ज्यांनी मुंबई गोवा रोडवर तुमच्याच अधिकाऱ्यांना काळे फासण्याच्या घटना घडल्या. ते करणारे आज तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना करते, असे चित्र उभे करू नका. मुंबई गोवा महामार्गाची आज काय अवस्था आहे ते पाहा.” असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्याबरोबर आहेत

चौकशीत ते खरे शिवसैनिक आहेत की आमच्या नावाने कुणी बोंबाबोंब करते, ते बाहेर येईल. त्यांनी जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये होते, असं म्हटलं पाहिजे होतं. शिवसेना का म्हणता? मुंबई गोवा रोड आम्ही करतोय का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्याबरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का?” असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारलं. विकासाच्या कामाला कुणी विरोध करता कामा नये ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची न्याय भूमिका आहे आणि ते त्यापद्धतीने न्याय देतील, अशी हमीही त्यांनी दिली.

गडकरींच्या पत्रावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते वाशिमचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याविषयी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री असून गेल्या दिड ते दोन वर्षात अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. वाशिमला जात असून सीएमओकडून पत्राबाबत माहिती घेईन, असं शंभूराज देसाई म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वरुण सरदेसाई आता आला, तर माघारी जाणार नाही” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ईशारा!

News Desk

कॉंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

पंढरपूरची निवडणूक ठरली घातक! गावागावांत रुग्णांचे मृत्यू, हॉस्पिटल्सही भरले

News Desk