HW News Marathi
महाराष्ट्र

पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? शिवसेनेच्या या प्रश्नाला भाजपकडून प्रत्युत्तर 

रत्नागिरी | लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. भास्कर जाधव यांनी त्यांची पाठराखण करताना पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवला. मात्र, भास्कर जाधव यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे असे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितले. कोकणातील राजकीय वर्तुळाता त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरुन शिवसेनेवर टीकास्त्र केले आहे. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री, सेना आमदार भास्कर जाधवांचं धक्कादायक विधान… हो बरोबर आहे नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ?, असा प्रश्न भातखळकरांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही! – सुप्रिया सुळे

Aprna

परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्याची राज्यपालांची मागणी

News Desk

‘पुन्हा येण्यात’ अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची जिद्द बघता कौतुकही करावंसं वाटतं – रोहित पवार 

News Desk