HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर !

मुंबई | शिवसेनेतर्फे आज (१७ जुलै) शेतकऱ्यांसाठी मुंबईत पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात आला होता. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली होती. दरम्यान, सत्तेत असूनही आंदोलने करणाऱ्या शिवसेनेवर सर्व राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले आहे. “शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला आहे”, अशी बोचरी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेवर टीका केली होती. “महाराष्ट्रात २०१४ सालापासून शिवसेना भाजपचे सरकार असूनही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काहीही बोलत नाही आणि बाहेर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखी शिवसेनेला आंदोलने करण्याची भाषा करावी लागते. शेतकऱ्यांसाठी ही मोर्चा काढण्याची भाषा म्हणजे केवळ शिवसेनेची नौटंकी आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार आणि संजय राऊतांची यासाठी भेट

News Desk

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

News Desk

कामचुकार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री योगींचा थेट सरप्राईज कॉल

News Desk