HW News Marathi
महाराष्ट्र

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई | अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज (३ जून) दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठैवण्यात आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात महाविकासआघाडी ‘मिनी यूपीए’चा प्रयोग!” – संजय राऊत

News Desk

एकही शाळा बंद करु देणार नाही, छात्र भारतीचा इशारा

News Desk

काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली! – मुख्यमंत्री

Aprna