HW News Marathi
महाराष्ट्र

आता राज्यातील गोरगरिबांना १० रुपयांत मिळणार भोजन

नागपूर | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आज (२१ डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह राज्यातील गोरगरिबांना १० रुपयांत थाळी भोजन देण्याची देखील घोषणा केली आहे. “आमच्या सरकारने असे ठरवले आहे की गोरगरिबांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी याची घोषणा केली आहे. सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येईल. शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिल्यानंतर यावर शंका उपस्थित करत मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. मात्र, आता लवकरच ही योजना राबविण्यात येणार असल्याचे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात एक मुख्यमंत्र्यांचं कार्यालय

“महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात एक मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे. “महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेला अनावश्यक हेलपाटे मारायला लागू नये म्हणून आमच्या सरकारने एक निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात एक मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आम्ही सुरू करत आहोत”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा देखील आज केली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

“महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही पारदर्शक असेल.यातला पैसा हा शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पोचला जाईल, मध्ये कुठेही त्याला अटी-तटी शर्थींचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा मनोदय आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर भाजपने सभात्याग केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. “७/१२ कोरा करण्याचा शब्द सरकारने पाळला नाही. राज्यातील तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे”, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. “शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कोरडवाहूला आणि हेक्टरी ५० हजार रुपये बागायतीला, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी जरी केली असली तरीही या अधिवेशनात एक नवा पैसे देखील या सरकारने दिलेला नाही”, असे फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे?’ चित्रा वाघांचा अहमदनगर सुसाईड क्लिप वरून उठवला प्रश्न

News Desk

ब्रेकिंग! मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

Manasi Devkar

PandharpurElection : आघाडी पिछाडीचा खेळ सुरुचं, समाधान आवताडे १६व्या फेरी अखेर आघडीवरच!

News Desk