HW News Marathi
Covid-19

तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या ! संजय राऊतांनी भाजपला सुनावले

मुंबई । “केंद्रीय सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत”, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांसह यांच्यासह मोदी सरकारवर शरसंधान साधले आहे. राज्यात एकीकडे कोरोनास्थिती गंभीर आहे तर दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये जुंपली आहे. तर राज्यातही ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-टिकांचे सत्र सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी भाजपवर हा जोरदार निशाणा साधला आहे. “जगाच्या इतिहासात मी असं कधी पाहिलं नव्हतं. दिल्लीच्या सरकारमध्ये बसून आपल्याच राज्याची बदनामी करायची हे कोणतं राजकारण आहे?”, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “टीकाकारांनी आपले रक्त मराठी माणसाचे आहे की नाही हे तपासावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे रक्त तुमच्या धमन्यांमध्ये असेल, तर तुम्ही असे एकमेकांवर टीका करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात मात्र आताचे संकट भयंकर आहे. कोरोना विरोधातील लढाई ही आमची व्यक्तीगत लढाई नाही. आम्ही केंद्राच्या नेतृत्वात लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातील जनता ही मोदींची जनता नाही का?”, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या !

भाजपला सुनावताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपच्या १०५ आमदारांना महाराष्ट्रातील जनतेनेच निवडून दिले आहे. तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या. महाराष्ट्र जेवढा तुमचा आहे, तेवढा आमचाही आहे. महाराष्ट्राची जनता जेवढी तुमची आहे, तेवढी आमचीही आहे. हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे. कुठल्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी महाराष्ट्रावर नाही”, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले !

संजय राऊत यांनी यावेळी संभाजी भिडेंच्याही वक्तव्याचा समाचार घेत भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. संभाजी भिडेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपचे एक विचारकाने आपले मत मांडताना महाराष्ट्रातील जनतेबद्दल अपशब्द पावरले. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवला आहे. आताही शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचे ठरवले तर, पळता भूई थोडी होईल”, असाही इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये लॉकडाऊन लागू शकतो !, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

News Desk

अनेक राज्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले !

News Desk

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंनी केलं कौतुक

News Desk