HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आपले प्रत्येक वचन पूर्ण करेल !

मुंबई ।“शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा ही राजकीय यात्रा नाही. शिवसेना हा केवळ निवडणुकीपुरता पक्ष नाही तर २४ तास जनतेची सेवा करणारा पक्ष आहे. शिवसेना दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करेल”, असे विधान युवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा बुलढाण्यात पोहोचली असता आदित्य ठाकरे बोलत होते.

“जनआशीर्वाद यात्रा ही काही राजकीय हेतूसाठी काढलेली यात्रा नाही. तर ही यात्रा सर्वांना आठवण करून देण्यासाठी आहे की शिवसेना हा केवळ निवडणुकीपुरता पक्ष नाही तर २४ तास जनतेसाठी काम करणारा, जनतेची सेवा करणारा पक्ष आहे”, असं विधान केले आहे. त्याचप्रमाणे “आपल्याला जातपात बाजूला ठेऊन एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला प्रचंड प्रेम दिले. म्हणूनच जनतेचे आभार मानण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. जनतेने केवळ मला आशीर्वाद द्यावा”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिंपरीतील कोरोनाग्रस्त होत आहेत बरे, ५ जणांना आज मिळाला डिस्चार्ज

swarit

MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरीही विद्यार्थ्यांना दिवाळीची सु्ट्टी मिळणार – वर्षा गायकवाड

News Desk