HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेची ‘जन आशीर्वाद’ यात्रा स्थगित

मुंबई | संपूर्ण राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अजूनही अनेकजण या पुरात अडकून पडले आहेत. दरम्यान, या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांना अखेर जाग आली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ आता शिवसेनेने देखील आपली ‘जनआशीर्वाद यात्रा’ काही काळासाठी स्थगित केली आहे. दरम्यान, राज्यात इतकी भीषण पूरस्थिती असतानाही कालपर्यंत (८ ऑगस्ट) मात्र शिवसेनेत पक्षप्रवेश सुरु होते. त्यावरून, शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोघेही येत्या २ दिवसात राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे, शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी त्यांचा एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आधी भाजपची महाजनादेश यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके हे पूरग्रस्त नागरिकांना मदत करत असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामान्य नागरिक समोर ठेवून सुशासन नियमावली तयार करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Aprna

फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंकडून रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

Aprna

महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक – सामना अग्रलेख

News Desk