HW News Marathi
महाराष्ट्र

श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून तडीपार

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपमधून बडतर्फ केलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, या मागणीसाठी उद्या नगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती.

छिंदम याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे. नगरमध्ये उद्या सकाळी 11 वाजता शिवप्रेमींच्या वतीने छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होणार असून तो माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छिंदमला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

‘केंद्र सरकारला आता ट्विटरवर कारवाई करण्याचं स्वातंत्र्य’, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना नोटीस!

News Desk
महाराष्ट्र

भारताची वाटचाल सिरियाच्या दिशेने | प्रकाश आंबेडकर

News Desk

पुणे | देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या देशाला आता कोणी एक नेता राहिलेला नाही. संपूर्ण समाज जाती-जातीत विभागले गेला आहे. त्यामुळे आपल्या देशाची अवस्था आता सीरियाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपींना तत्काळ अटक करता येणार नाही, असा निर्णय मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिला होता. यानंतर देशभरातील दलित संघटना आक्रमक झाला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज दलित संघटनांनी भारतबंदचे आवाहन केले आहे. त्याचे पडसाद देशभर पडले आहेत.

Related posts

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

News Desk

शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, बाळा नांदगावकरांचे मोठे वक्तव्य

News Desk

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन! ‘आरटीआय’चे पत्र ट्विट करत भाजपचा गौप्यस्फोट

News Desk