HW News Marathi
महाराष्ट्र

“अशोक चव्हाणांच्या घरापुढे 20 ऑगस्टला मूक मोर्चा”, संभाजी राजेंची राज्यव्यापी बैठकीत घोषणा!

पुणे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वातावरण चिघळल आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात आज राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. यात मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेण्यात आला.

गायकवाड समितीतल्या त्रुटींचा अभ्यास करणे गरजेचे

तर या बैठकीत संभाजीराजे म्हणाले राज्य सरकार हे विसरले की आपण रिव्ह्यू याचिका केली आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे असा इशारा देखील त्यांनी ठाकरे सरकारला दिलाय. तर गायकवाड समितीच्या त्रुटी असतील तर त्याचा देखील अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचा आहे असे देखील संभाजीराजे पुण्यात बोलताना म्हणाले. तर राज्य सरकारने समाजाला सामाजिक मागास दाखवणे देखील गरजेचं असल्याचं संभाजीराजेंनी नमूद केलं.

टिकणार आरक्षण कसं द्यायचं हे राज्यसरकारने ठरवावं

पुढे बोलताना संभाजी राजे पुण्यातल्या बैठकीत म्हणाले माझी भूमिका तर स्पष्ट आहे, टिकणार आरक्षण कसं द्यायचं हे राज्यसरकारने ठरवावं, मी खरंच गोंधळून गेलेलो आहे की नेमका आरक्षण कोणत्या मार्गाने मिळेल. यावेळी संभाजीराजे यांनी स्पष्ट केले की मला राजकीय धोका नाही पण सामाजिक भीती असल्याचं नमूद केले. मी मराठ्यांचा नेता आहे, मात्र मी वंचितांचे नेतृत्व करतो.

अशोक चव्हाणांच्या घरापुढे मुकमोर्चा

तर पुण्यात आयोजित केलेल्या राज्यव्यापी बैठकीत आता पुढचं पाऊल काय असेल हे संभाजीराजेंनी नमूद केले येत्या 20 ऑगस्टला नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या घरा पुढे मुख्य मोर्चाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको

आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला. ही बैठक काल तुळजापूरमध्ये पार पडली. जे आमदार खासदार मराठा समाजाला मदत करीत नाहीत हेटाळणी करतात त्यांना यापुढे विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आलाय.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची चिंतन बैठक काल पार पडली. या बैठकीमध्ये मोर्च्याचे राज्यातील विविध समन्वयक उपस्थित होते. जवळपास दोन तास चाललेल्याया बैठकीमध्ये विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय राज्यस्तरीय मेळाव्यात घेण्यात येईल, असं आयोजकांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar

चक्रीवादळामुळे झालेली नुकसाभरपाई द्यावी – फडणवीस

News Desk

‘राज्यपाल महाराष्ट्राची मोठी समस्या’; शिवसेनेची टीका

News Desk