HW News Marathi
महाराष्ट्र

नावेत बसून सेल्फी काढणे बेतले जीवावर

यवतमाळ | सकाळी साडे नऊच्या सुमारास हे ५ तरुण यवतमाळ तालुक्यातील राजूर गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र, आंघोळी वेळी नदीत नावेवर बसून सेल्फी घेण्याचे साहस या तरुणांच्या जीवावर बेतले आहे. या पाच तरुणांपैकी शेख अर्षद (१४), शेख सुफिर सिराज (१६) या दोन तरुणांचा नदीत सेल्फी घेताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर सय्यद उमेद (१८) या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. मोहरम सणासाठी आदिलाबाद येथील हे पाच तरुण यवतमाळ तालुक्यातील राजूर येथे आले होते.

तिथल्याच एका मच्छिमाराने गावाला या दुर्दैवी घटनेबद्दलची माहिती दिली. त्यानंतर गावातील लगेचच प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यापूर्वीच डॉक्टकरांनी त्यांपैकी दोघांना मृत घोषित केले होते.यवतमाळ तालुक्यातील राजूर येथील पैनगंगा नदीत दिसलेल्या नावेत बसून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांना झाली होती. या पाचही तरुणांचा त्या नावेवर बसून सेल्फी काढताना नावेचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. तेथील डोह खोल असल्याने त्या तरुणांना पाण्यातून बाहेर येणे अवघड झाले. या नदीच्या पात्रात बुडालेले सर्वच जण तेलंगणाच्या आदिलाबद येथील रहिवासी आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण

swarit

देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी, राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

महाराष्ट्रावर नवे संकट! परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यु

News Desk
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव | पाच जणांची नजरकैद कायम

News Desk

नवी दिल्ली | भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील पाच विचारवंतांचा निकाल राखीव ठेवल्यामुळे त्यांची नजरकैद कामय आहे. येत्या सोमवार (२४ सप्टेंबर) रोजी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या पाच विचारवंताचा सुटकेसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आले होते. या विचारवंतांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकवण्याच्या कटात या पाच विचारवंत सहभागी होते, असा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आला होता. न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुणे पोलिसांना शनिवारपर्यंत संपुर्ण खटल्याचा तपशील न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्यांना देखील लेखी दस्तऐवज जमा करण्यास सांगितले असून पुरावे बनावट आढळल्यास खटला रद्द करू, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. यापूर्वीही एल्गार परिषदेशी संबंधित सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. याबाबत कबीर कलामंचावर देखील पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी या पाच विचारवतांना २८ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. “अर्बन नक्सल”चा आरोप ठेवत यांना अटक करण्यात आली होती. अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह, आनंद ग्रोव्हर, अश्विनीकुमार, राजीव धवन, आणि प्रशांत भुषण सर्वोच्च न्यायालयात विचारवंताच्या बाजूने भूमिका मांडत आहेत. पुणे पोलिसांनी सबळ पुरावे दिल्यास एसआयटीचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत स्पष्ट केले होते.

Related posts

काँग्रेसने काही दलालांना फूस लावून शेतकरी आंदोलन सुरू केलं, राणेंचा गंभीर आरोप 

News Desk

माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घरातच झाला कोरोना, नारायण राणेंचा टोला

News Desk

शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल, उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया

News Desk