HW News Marathi
महाराष्ट्र

“बॉलिवूड इंडस्ट्रीत आज एकापेक्षा अधिक दिग्गज आहेत, ते गप्प का आहेत?”, राऊतांचा सवाल

मुंबई | दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना नुकतीच घडली होती. यावरुन आजच्या सामना अग्रलेखातून केंद्रावर निशाणा साधला आहे. देशात जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा तेव्हा सिने उद्योगातील लोकांनी सर्वात आधी आवाज उठवला आहे. परंतु आज देशात दडपशाही सुरू असताना बॉलिवूडमधील दिग्गज गप्प का आहेत? असा सवाल करतानाच आवाज उठवणं केवळ तापसी पन्नू किंवा अनुराग काश्यप यांचं काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, असं आवाहनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बॉलिवूडला केलं आहे.

दिग्दर्शक अनुराग काश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्या आहेत. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी बॉलिवूडला हे आवाहन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची जेव्हाही गळचेपी झाली तेव्हा सिने उद्योगाने सर्वात आधी आवाज उठवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. ही पद्धत बरोबर नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू नये.

हा लोकशाही देश आहे. मोदी लोकशाही मार्गानेच सत्तेत आले आहेत. लोकशाहीने येऊन कोणी हुकूमशाही राबवत असेल तरी हा लोकशाही देश आहे, असं सांगतानाच सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा. केवळ अनुराग काश्यप आणि तापसीचं हे काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. इंडस्ट्रीत आज एकापेक्षा अधिक दिग्गज आहेत. ते गप्प का आहेत? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात

News Desk

काँग्रेस पक्ष सरकारविरोधातील संघर्ष आणखी तीव्र करणारः खा. अशोक चव्हाण

News Desk

रामदास आठवले घेणार अमिताभ बच्चन यांची भेट

News Desk