HW News Marathi
महाराष्ट्र

…तर पुढील अनेक वर्ष चांगल्या कामासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील ! | धनंजय मुंडे

बीड | “बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या ४ वर्षात विकासाचे असे काम करू की पुढील अनेक वर्ष त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील”, असे विधान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.

“गेल्या सरकारच्या काळात ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ” असा शब्दही यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढे बोलताना, “ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकून सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करून देणे आणि जिल्ह्याची मागासलेपण दूर करणे हा आपला निर्धार आहे”, असेही बोलून दाखवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

आपलं सरकार असतानाही जर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा… काँग्रेसचा सल्ला

News Desk

भीमा कोरेगाव प्रकरण – राष्ट्रीय तपास यंत्रणेने ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले

News Desk