HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात!

मुंबई। कथित घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत ईडी कार्यालयात पोाहेचले आहेत. काल जाहीर केल्याप्रमाणे ते ईडीकडे आज अधीकृत तक्रार करणार असून त्याबाबत कागदपत्रे सोपविणार आहेत.कागलचे आमदार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते.

२७०० पानी पुरावे…!

“मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी

किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आले असते. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा आरोप सोमय्यांनी माझ्यावर केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. असे असताना आता किरीट सोमय्या आरोप करत आहेत. मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली? काय आहे पार्श्वभूमी

Seema Adhe

औरंगाबादहून रस्त्याला यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते !

swarit

पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुदामवाडी गाव प्रथम 

News Desk