HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : एसटी कर्मचाऱ्यांनी १० तारखेपर्यंत कामावर रुजू व्हा, अनिल परबांचे अल्टिमेटम

मुंबई | “एसटी कर्मचारी १० तारखेपर्यंत कामावर कामावर रुजू झाले नाही. तर एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही, असे आम्ही समजू… मग त्याबाबती कायदेशीर ज्या काही प्रक्रिया राबवायच्या आहेत. त्या आम्ही राबवू,” असा धमकी वजा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. या अहवालात आर्थिक, कायदेशीर आणि प्रशासकीय संदर्भात विलीनीकरण शक्य नाही. हा अहवाल आज आलेला आहे. म्हणून मी आज कामगारांना पुन्हा एकदा आवाहन करतो की, आपण कामावर यावे, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, ज्यांचे निलंबन झालेले आहे. त्यांचे निलंबन आम्ही मागे घेतले आहे, असेही आवाहन परबांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.  परबांनी आज (४ मार्च) त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवला आहे. विधानसभेत अहवाल सादर केल्यानंतर विरोधाकांनी सरकारवर एसटीच्या मुद्द्यांवर टीका केली आहे. 

एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले, “त्रिसदस्यी समिती जी नेमली होती, या त्रिसदस्यी समितीचा अहवाल जो १२ आठवड्यात द्याचा होता. त्यांनी तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यते नुसार, मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. हा अहवाल दिल्यानंतर न्यायालयाने जे सुतोवाज केले होते की, हा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करा,. न्यायालयाच्या सांगण्यानुसार, त्रिसदस्यी समितीने हा अहवाल मंत्री मंडळासोमर सादर केला आहे. यानंतर हा अहवाल मी आज विधानसभेच्या पटलावर ठेवला आहे. या अहवालात आर्थिक, कायदेशीर आणि प्रशासकीय संदर्भात विलीनीकरण शक्य नाही. हा अहवाल आज आलेला आहे. म्हणून मी आज कामगारांना पुन्हा एकदा आवाहन करतो की, आपण कामावर यावे, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, ज्यांचे निलंबन झालेले आहे. त्यांचे निलंबन आम्ही मागे घेतले आहे. ज्यांना बडतर्फीची नोटीस निघाली, परंतु, जे बडतर्फी झालेले नाही, त्यांची बडतर्फीची नोटीस आम्ही मागे घेतली आहे. त्याचबरोबर ज्यांना बर्डतर्फ केले गेले त्यांना आम्ही कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांनी अपील करावे, त्या अपीलाच्या माध्यमांतून आम्ही त्यांना परत कामावर घेऊ. हे सर्व करण्यासाठी आम्ही त्यांना १० मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.”

एसटी कर्मचारी १० मार्चपर्यंत एसटी कर्माचरी कामावर रुजू झाले नाही, असा प्रश्नच परबांना एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी विचारला होता. यावर परब म्हणाले, “याबाबती आम्ही असे समजू की, एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही. मग त्याबाबती कायदेशीर ज्या काही प्रक्रिया राबवायच्या आहेत. त्या आम्ही राबवू, असा इशारा ही परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.” यावर परब म्हणाले, “सदाभाऊ खोत यांनी कामगारांचे नेतृत्त्व केले होते. आणि आम्ही सदाभाऊ खोत यांच्यासोबत बसून आम्ही प्रश्न मिटवले होते. परंतु, सदाभाऊ खोत यांचे देखील कामगारांनी ऐकलेले नाही. त्यामुळे आता एकदा ते जर एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व करणार असतील तर त्यांना नेतृत्व करू देत, मग पुढे बघू काय करायचे आहे ते,” असे सूचक विधान परबांनी सदाभाऊ खोत हे सोमवारपासून एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणार आणि आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३३ वर पोहचला, तर देशात रुग्णांचा आकडा ११० वर

swarit

शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी !

News Desk

भाजप नेते नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्यामुळे उपचारासाठी कोल्हापुरात आणले

Aprna