HW News Marathi
महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी एसटी महामंडळ काढणार २००० कोटींचं कर्ज

मुंबई | कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासूनचे एसटी कामगारांचे पगार थकले आहेत. सणा सुदीलाही सुरुवात झाली आहे. त्यात आता दिवाळीही आली आहे. इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार असून त्याकरिता एसटी महामंडळ २ हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच एसटीकडून राज्य सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. कोरोनाकाळात एसटीला मिळणार २२ कोटींचं उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा तोटा साडे पाच हजार कोटींचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजे. नाही तर तोटा वाढतो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधनं वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झालं. त्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत.

त्यातच दिवाळी सारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याला मोठा तोटा सहन करावा लागल्याने एसटीला मदत करावी अशी शासनाचीही परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचं कर्ज काढण्यात येईल, असे परब म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलनायक निवडीसाठी 24 एप्रिलपर्यंत अर्ज करा

News Desk

‘हॅास्पिटलमधूनही पवारांची राज्य आणि देशावर बारीक नजर’ संजय राऊतांनी घेतली पवारांची भेट

News Desk

पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन !

News Desk