HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

मुंबई । राज्यभरात आजपासून (२१ फेब्रवारी) बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. पहिला पेपर आज सकाळी ११ ते २ वाजताच्यादरम्यान इंग्रजी विषयाचा होणार आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्च हा कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील एकूण नऊ मंडळातून जवळपास १४ लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८,१५१ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात २९५८ परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे २ व्हायरस लोकांवर कधीही ग्रासतील –  अमृता फडणवीस

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक

News Desk

महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल, कळणारच नाही ! चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

News Desk