HW News Marathi
देश / विदेश

बदलीच्या रागातूनच परमबीर सिंह यांनी माझ्यावर ‘ते’ आरोप केले !

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आपल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. राज्याच्या राजकीय वातावरणावर याचे तीव्र पडसाद उमटले. परिणामी अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्यावर तोफ डागली आहे. “परमबीर सिंह यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मी त्यांची ताबडतोब बदली केली होती. त्याच रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत”, असे अनिल देशमुख यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

परमबीर सिंह यांच्याबाबत पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, “घाडगे, डांगे, सोनु जालन, केतन अशा अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी परमबीर सिंग यांच्याबद्दल येत आहेत. ते मुंबईचे पोलीस आयुक्त असताना अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन सापडणं किंवा मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही घटनांच्या बाबतीत परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भूमिका ही संशयास्पद होती. परमबीर सिंह यांनी केलेल्या चुका माफ करण्यालायक नव्हत्या. म्हणून मी परमबीरसिंह यांची पदावरून बदली केली होती. त्याच रागातून त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले.”

अनिल देशमुख याबाबत बोलताना पुढे म्हणाले की, “मी एका कार्यक्रमात देखील सांगितलं होतं की परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची संशयास्पद भूमिका होती. गेल्या ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप नाही. त्यामुळेच मी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असेही अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुषमा स्वराज यांना ‘पंतप्रधान’पदाचा उमेदवार म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी दिला पाठिंबा

News Desk

बाबरी मशीद अन्यत्र बांधण्याची वक्फ बोर्डाची तयारी

News Desk

परीक्षेशी आरोग्य विभागाचा संबंध नाही, मात्र तरीही….

News Desk