HW News Marathi
देश / विदेश

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | “महाविकासआघाडी सरकारने एक उमेदवार मागे घेतला पाहिजे. तर घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या तीन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना बोलताना म्हणाले. भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि भाजप नेते धनंजय महाडिक या तिघांनीही आज (३० मे)  विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या आमदारांच्या उपस्थितीत त्यांनी विधीमंडळात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

फडणवीस म्हणाले, “आम्हाला घोडेबाजार करायचा प्रश्नच येत नाही. आमचे तीन लोक निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आमचे तीन, त्यांचे तीन महाविकासआघाडीने त्यांचा एक उमेदवार मागे घेतला पाहिजे. तर घोडेबाजाराचा काही प्रश्नच उरत नाही. पण, जरी त्यांनी ठेवला, तरी आम्ही कुठला घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार भाजपच्या पक्षातील आहेत. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. आणि आमचे तिन्ही उमेदवार राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की सदसद्विवेकबुद्धी देखील काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील.” अपक्षांची सात देणार का?,यावर फडणवीस म्हणाले, “आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला. त्याचा अर्थ असा आहे. आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज विचारपूर्वक भरला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, आम्ही आमचा तिसरा उमेदवार निवडून आणू.

मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल फडणवीसांनी केले अभिनंदन

भाजपच्या तिन्ही नेत्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर फडणवीसांनी “आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ८ वर्ष पूर्ण झाले आहेत. याबद्दल मी भारताच्या जनतेचे आभार मानतो. आणि मोदी सरकारचे अभिनंदन करतो. आठ वर्षात नव भारताचे जे चित्र निर्माण केले आहे. गरीब आणि मध्यम वर्गीयांपासून प्रत्येकाला ते भावले. आणि म्हणून मोदीजी जगातील सर्वा प्रसिद्ध नेते आणि मान्यता प्राप्त नेते झाले आहेत. आज राज्यसभेच्या निवडणुकी करता. भाजपच्या वतीने तीन उमेदवारांची उमेदवारी दाखल केलेली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जात आहेत. पियुष गोयल यांच्याबद्दल सर्व माहिती आहेत. पियुष गोयल हे मुंबईचेच आहेत. राज्यसभेमध्ये नेते म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. आणि पुन्हा एकदा पियुष गोयल हे महाराष्ट्रातून जात आहेत. यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यासोबत डॉ. अनिल बोंडे आपल्याला कल्पना आहे ते राज्याचे कृषी मंत्री राहिलेले आहेत. आणि कृषी क्षेत्रातील तज्ञ म्हणून तरी ते एमबीबीएस डॉक्टर असले. ते भाजपचे उमेदवार आहेत. त्यासोबत मुनाजी महाडिक जे कोल्हापूरचे आहेत जे कोल्हापूरचे खासदार राहिले आहेत. आणि सहकाराच्या क्षेत्रात मोठे नाव आहे. हे आमचे तिसरे उमेदवार आहेत. आमचे तिन्ही उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले आहेत. आणि मला विश्वास आहे की आमचे तिन्ही उमेदवार याठिकाणी निवडून येतील. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

News Desk

केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर आणली बंदी, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ!

News Desk

मनसुख मांडवीया यांनी केली राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 2022 ची सुरवात

News Desk