HW News Marathi
महाराष्ट्र

“जर पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर…”, तुषार भोसलेंचा अजितदादांना इशारा

नाशिक | यावर्षी देखील आषाढी वारी वारकऱ्यांशिवाय होणार आहे. कोरोनाचा प्रसार लक्षात घेता वारीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे.

आज (१२ जून) नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या निर्णयाचा विरोध केला. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असे तुषार भोसले यांनी म्हटले.

काय म्हणाले तुषार भोसले?

मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे. काही वारकरी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. कुंभमेळ्याचे शेवटचे शाही स्नान झाल्यामुळे वारीला एवढी गर्दी होणार नाही. पालखी सोहळ्यात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वारकरी संप्रदाय तयार होता. मात्र, सरकारने परस्पर निर्णय घेतला. या निर्णयाला कोणत्याही वारकऱ्याने पाठिंबा दिला नसल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले.

आषाठी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी, अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे अनेक सण उत्सव सुरु होताना दिसत आहेत. अशात आषाढी वारीला पालखी कशी न्यायची हा मोठा प्रश्न वारकऱ्यांसमोर उभा होता. यावर आता ठाकरे सरकारने निर्णय दिला आहे. आषाढी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

काल (११ जून) पुण्यात ते बोलत होते. दरम्यान, आषाढी वारीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विचार करुन हे सांगतिलं आहे. त्यामुळे या वारीला १० मानाच्या पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार आहेत. यावेळी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच, भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच, देहू आळंदी पालखीबरोबर १०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.

१० मानाच्या पालख्या कोणत्या?

१- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

२- संत तुकाराम महाराज (देहू)

३- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

४- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

५- संत सोपान काका महाराज (सासवड)

६- संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७- संत एकनाथ महाराज पैठण

८- रुक्मिणी माता (कौडानेपूर) अमरावती

९- संत निळोबाराय (पारनेर अहमदनगर)

१०- संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

पायी जाण्यास मज्जाव, रिंगण-रथोत्सावाला अटींवर परवानगी

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, असं ते म्हणाले आहेत.

भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद

दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संयम सोडू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यापाऱ्यांना आवाहन!

News Desk

“‘मविआ’चा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही”, ठाकरेंचा आंबेडकरांना सल्ला

Aprna

पुण्यातील ९ हजाराहून अधिक कुटुंबांना मिळाली टुमदार घरे

Aprna