HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा, परिपत्रकातील निकषांवर सर्व स्तरांतून टीका

मुंबई | मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीबाबत राज्य सरकार दाखवत असलेली असंवेदनशीलता संतापजनक असल्याची प्रतिक्रिया सध्या सर्वत्र उमटत आहे. फडणवीस सरकारने एक परिपत्रक काढून कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या परिपत्रकात पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी नमूद करण्यात आलेल्या निकषांमुळे आता संताप व्यक्त केला जात आहे. अतिवृष्टी किंवा पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून २ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ते क्षेत्र पाण्याखाली बुडल्यास तेथील पूरग्रस्त कुटुंबांना १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू अशी मदत राज्य शासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकार चक्क या परिपत्रकाद्वारे पुरग्रस्तांची थट्टा करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. “राज्यात एवढी भीषण स्थिती ओढवलेली असताना सरसकट सर्व पूरग्रस्तांना मदत मिळणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे जीआर का काढले जात आहेत ? सरकारनं अशा प्रकारे पूरग्रस्तांची थट्टा करू नये “, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. “सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. लोकांना मदत देण्याऐवजी सरकारमधील मंत्री चक्क सेल्फी काढत फिरत आहेत. हे पाहिल्यानंतर मन उद्विग्न होत”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी

News Desk

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम

News Desk

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच !

News Desk