HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारने आता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी !, फडणवीसांचा खोचक सल्ला

मुंबई । “राज्य सरकारने आता नुसता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी”, असा खोचक सल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. “राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. रोज प्रसारमाध्यमांमध्ये माईकसमोर येऊन नुसते बोलतात. मात्र, प्रत्यक्षात निर्णय कधी घेणार”, असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

हिंगोली जिल्ह्याचा दौरा सुरू करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारआता जागे व्हायला हवे. सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत कोणतेही गांभीर्य नाही. अशा परिस्थितीतही सरकारमधील नेते फक्त टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा करत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा हा आक्रोश समजून घेऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे”, अशीही मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यातील एकीकडे अनेक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या या संकटाला सामोरे जात असताना याचवेळी दुसरीकडे बँकांनी मात्र शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. शेतकऱ्यांना दिवसातून ४-५ वेळा बँकेतून फोन येतात. काही वेळा बँकेची माणसंही थेट घरी येतात. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पावले उचलली पाहिजेत. सरकारने तातडीने बँकांना शेतकऱ्यांकडून होणारी कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. त्याचप्रमाणे, आदेशांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणीही यावेळी फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात

swarit

पाटणमध्ये शिवसेना नेते शंभूराज देसाई यांची आघाडी, तर राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची पिछाडी

News Desk

“किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार!”

News Desk