HW News Marathi
महाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांनीही जनतेला बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे

संगमनेर | कोरोना व्हायरसचा घेरा हा भारताला आणि महाराष्ट्राला घट्ट आवळतच आहे. महाराष्ट्रात ६४ जण कोरोनाबाधित आहेत. तसेच, जगभरात ११ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. एकट्या चीन आणि इटलीमध्ये ६ हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत. १७७ देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूच्या कचाटीत २.५ लाखांहून अधिक लोक अडकले आहेत. हा विषाणू भारतातही झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात उद्या (२२ मार्च) जनता कर्फ्यू घोषित केला आहे. दरम्यान, नेते, अभिनेते जनतेला घरीच राहण्याचे व गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करीत आहेत. अशातच कायमच वादाच्या भोवऱ्यात असणारे इंदोरीकर महाराज कसे लांब राहतील. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनीही जनतेला घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात जे आवाहन केले आहे त्यास सर्व नागरिकांनी सहकार्य करा. आपले गाव, आपले शहर, आपला देश या संकटातून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे व प्रशासनाचे काम नसून हा सर्वांचा लढा आहे, असेही इंदोरीकरांनी म्हटले आहे. राज्यात ६४ जणांना कोरोना सारख्या आजाराने बाधित केलेले आहे. त्यामुळे आपले गाव, आपले शहर, आपला देश यातून मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे व ती अत्यंत गरजेची बाब आहे. सर्वांनी खबरदारी घ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन इंदोरीकर महाराजांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी पंकजा-प्रीतम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात

Aprna

सोमय्यांनी कागदपत्रं दिल्यास उद्धव ठाकरेंची चौकशी होणार – मुख्यमंत्री

News Desk

भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे

News Desk