HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे

मुंबई | भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. हा ताबा १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विजय स्तंभाच्या जागी ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विजय स्तंभास ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान हजारोंच्या संख्येने नागरिक भेट देणार आहेत. त्यामुळे या पूर्वनियोजित कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी विजय स्तंभ परिसराच्या जागेचा ताबा मिळण्याबाबत अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कार्यक्रम पार पाडल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली जागा पुन्हा होती तशी करुन देण्यात येणार असल्याची हमी राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली. ही विनंती मान्य करत न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही जागा राज्य सरकारकडे सोपवली आहे.

गतवर्षी याच ठिकाणी भीमा कोरेगाव परिसराजवळ झालेल्या दंगलीच्या हिंसाचाराचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उसळले होते. त्यामुळे तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारने यंदाचा हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या नियोजनात पार पाडण्याचे ठरवले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही !

News Desk

“सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न!” – भुजबळ

News Desk

भाजपचा पुढच्या महिन्यात सरपंच मेळावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

News Desk