HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही सर्व आत्महत्या करू !, पूजाच्या कुटुंबीयांचा इशारा 

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणात, अडचणीत सापडलेल्या शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भाजप मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्ष इतका आक्रमक होऊनही अद्याप शिवसेनेकडून अथवा महाविकासआघाडी सरकारकडून अधिकृत अशी कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे, “संजय राठोड यांचा राजीनामा घेईपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही”, असा इशाराही भाजपने दिला. या प्रकरणी सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार जुंपलेली असताना आता पूजाच्या कुटुंबीयांनी मात्र निर्वाणीचा इशारा दिला आहे. “पूजाच्या मृत्यूपेक्षा बदनामी जास्त केली जात आहे. ती बदनामी थांबवा अन्यथा आम्ही आत्महत्या करू”, असा इशारा पूजाच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. “माझ्या मुलीची बदनामी थांबवा”, अशी विनंती केली आहे. तर पूजाच्या आई मंडूबाई चव्हाण यांनी देखील भावनिक आवाहन करत टोकाची भूमिका घेतली आहे. “माझ्या मुलीची बदनामी थांबवा, नाहीतर आम्ही सर्वजण आत्महत्या करू”, असा इशारा पूजाच्या कुटुंबियांना दिला आहे. पूजाच्या आई म्हणाल्या कि, “माझ्या मुलीच्या मृत्यूपेक्षा तिची बदनामी खूप केली जात आहे. माझ्या पोटचा गोळा गेला, त्या दुःखात असून ही नाहक बदनामी केली जात आहे. त्यांना पोरी नाहीत का?” असा सवाल देखील यावेळी पूजाच्या आईने उपस्थित केला आहे.

आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे !

पूजाच्या आई यावेळी धक्कादायक खुलासा करत म्हणाल्या कि, “अरुण राठोड कोण आम्ही ओळखत नाही. विलास चव्हाण याला आमच्या पाचही मुली राखी बांधायच्या. तो मानलेला भाऊ होता”, असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे, पूजाचे वडील लहू चव्हाण यावेळी म्हणाले कि, “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मग या प्रकरणाचे राजकारण का केले जात आहे ?, कोण आहे चित्रा ? उद्यापासून जर आमची बदनामी थांबवली नाही तर आम्ही कुटुंबीय कोर्टासमोर येऊन आत्महत्या करणार”, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले! – नाना पटोले

Aprna

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने लागू केला ड्रेस कोड, सरकारी कार्यालयात कोणते कपडे घालावे याबाबतचे निर्देश जाहीर

News Desk

‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’, मनसेचे नवा अभिनव उपक्रम!

News Desk