HW News Marathi
महाराष्ट्र

शिवभोजन थाळीचे यशस्वी १७ दिवस

मुंबई | गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी २६ जानेवारी २०२० सुरु झाली. ११ फेब्रुवारी २०२० रोजी योजनेच्या अंमलबजावणीला १७ दिवस पुर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या थाळीची सुरुवात होऊन ८ दिवसातच म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक (१ लाख ५ हजार ८८७) झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत या लाभार्थ्यांच्या संख्येत १ लाखांहून अधिकांची वाढ झाली आहे.

गरीब आणि गरजूंना पोटभर जेवन मिळावे असा अट्टहास या योजनेमागे मुख्यमंत्र्यांचा होता आणि त्याच अनुशंगाने त्यांनी स्वत: या योजनेत जातीने लक्ष दिले. शिवभोजनेच्या या योजनेत जेवण देताना स्वच्छता पाळली जाते का, जेवणाचा दर्जा उत्तम आहे का याकडेही त्यांनी कायम लक्ष दिले. काहदिवसांपुर्वी उद्धव ठाकरेंनी ज्या शिवभोजन केंद्रातून या भोजनाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत जेवणाने ते समाधानी आहेत का याचीही विचारपूस केली.

शिवभोजनाच्या या थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतु लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन जेवणाचा आस्वाद घेता येतो. उर्वरित फरकाची रक्कम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अनुदान स्वरूपात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना आणि मुंबई आणि ठाण्यासाठी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्याची तरतूद योजनेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुष्यात माझी एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणे नितीन गडकरी

News Desk

आज ठाण्यात मनसेचा शेतकरी महामोर्चा

News Desk

शिवकुमार यांच्यासह नसीम खान, मिलिंद देवरा पोलिसांच्या ताब्यात

News Desk