HW News Marathi
महाराष्ट्र

…तर इस्राईलच्या पंतप्रधानांसारखी वेळ मोदींवर येऊ शकते – सामना अग्रलेख

मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे देशात गेले २-३ महिने लॉकडाऊन सुरू आहे. आता तरी हळूहळू अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी आधीच्या काही महिन्यांत अनेकांचे उघोग बंद झाले. देशाची आर्थिक स्थिती विस्कटली. लोकं बेरोजगार झाले. या लोकांच्या समस्यांचे निराकरण केले नाही तर कदाचित देशातील जनता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागेल, असा इशारा शिवसेना नेते आणि सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिला आहे. ‘सामना’तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी कोरोना काळातील केंद्र सरकार आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

या कार्यपद्धतीचा खुलासा करताना संजय राऊत यांनी इस्रायलचा दाखला दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू हे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत. आर्थिक डबघाई आणि कोरोनासंदर्भातील अपयश यामुळे संतापलेल्या इस्रायली जनतेने जागोजागी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरु केली आहेत. इस्रायलची जनता पंतप्रधान नेत्यानाहूंचा राजीनामा मागत आहे. ही वेळ हिंदुस्थानवरही येऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या कोरोना ‘मंदी’मुळे देशातील १० कोटी लोक रोजगार गमावणार आहेत. हा वरवरचा आकडा आहे. किमान ४० कोटी कुटुंबांच्या उपजीविकेवर आक्रमण होईल. लोकांच्या संयमालाही मर्यादा आहेत. नुसत्या आशेवर आणि आश्वासनांवर लोकांनी कुठवर दम काढायचा?, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तसेच या लेखात संजय राऊत यांनी कोरोनाच्या काळात राम मंदिराचे भूमिपूजन आणि राफेल विमानांसंदर्भातील बातम्यांना अवास्तव महत्त्व दिले जात असल्याचे म्हटले आहे. बातम्यांचे महत्त्व असे की, संकटावर कुणी बोलत नाही. भूक, बेरोजगारी कुणी तळमळ व्यक्त करताना दिसत नाही. संकट हीच संधी अशी वाक्ये तोंडावर फेकणे सोपे असते. पण लोक संकटांशी मुकाबला कसा करीत आहेत, हे कुणालाच माहीत नाही. पंतप्रधान मोदींच्या २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर पॅकेजचे शिंतोडे त्यांच्यावर उडाले आहेत काय, हा सवाल सरकारने स्वत:ला विचारला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…खूप शॉपिंग करा’, अमृता फडणवीसांचा पुणेकरांना अनोखा सल्ला!

News Desk

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरण; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Aprna

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा म्हणजे देशाला धोकाचं!- गृहमंत्री दिली वळसे पाटील 

News Desk