HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरकरांना दिलासा; राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश

कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात काल (२९ नोव्हेंबर) दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरवरील पूराचे संकट टळले आहे.

काल सकाळी साडे नऊच्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट उघडले होते. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागला होता. तसेच नदीपात्राची पाणी पातळी देखील वाढत होती. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

अथक परिश्रमानंतर यश

भोगावती नदी पात्रात अचानकपणे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार देण्यात आला होता. यावेळी नदीवर कपडे तसेच जनावरे धुण्यासाठी किंवा मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे.. कोल्हापूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळे महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर ! करेक्ट कार्यक्रम गंडला ….

News Desk

बडबड करणा-या लोकांना उत्तर देण्याची गरज नाही, रामदेवबाबांचा दिग्विजय यांना टोला

News Desk

दोनो रणजीत है,अटल अभी जीत है

News Desk