HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून प्रयत्न…

चंद्रपूर | “राज्यातील महापालिका केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर राज्याची दिशा ठरवू”, असे विधान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केले होते. याच विधानावरुन सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

“नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सद्य सरकारच्या परिस्थितीची जाणीव करुन देणारी आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या पैशांशी केंद्राचा काहीही संबंध नाही आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या राज्यामध्ये महानगरपालिका या स्वायत्त आहेत. महानगरपालिकेला स्वत:चे उत्पन्न वाढवण्याचा विशिष्ट कायदा आहे. मग यात केंद्राचा काय संबंध?”, असा खचक टोला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित पवारांना लगावला आहे.

“भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर आली पुढील २५ वर्षे आपल्याला सरकारमध्ये येता येणार नाही या भीतीने मतभिन्नता असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. एक पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिला पाहिजे असे म्हणणारा आहे, तर दुसरा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जगामध्ये कुणी वाईट लिहिणार नाही असे पुस्तक छापणारा आहे. ज्यांच्या विचारांमध्येच समानता नाही असे दोन टोकाचे पक्ष आज राज्यामध्ये सत्तेसाठी एकत्र आले आहेत. विकासाची कामे करुन राज्याची प्रगती करणे त्यांच्याकडून होणार नाही”, अशी शाब्दीक तलवारबाजी सुधीर मुनगंटीवारांनी केली.

“महाविकास आघाडीचे सरकार बनताच राज्यात बेरोजगारांचे प्रश्न संपले आहेत. मागच्या पाच वर्षात जे लोक बेरोजगारीचा विषय लावून धरत होते ते आता मात्र मंत्री झाले आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांना गावातील बेरोजगारांशी कोणतेही सोयरसुतक राहिलेली नाही. त्यामुळे येता-जाता, उठताबसता प्रत्येक गोष्टीत ते केंद्र सरकारला जबाबदार ठरवतात”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी दिली 25 हजाराची मदत….!

News Desk

बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे! – वर्षा गायकवाड

Aprna

राहुल गांधींचा नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

News Desk