HW News Marathi
महाराष्ट्र

तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती, भाजपची टीका

मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थिती आता थोड्याफार प्रमाणत सुधारत असून रूग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र असं जरी असली तरी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने यावर्षीचं पावसाळी आधिवेशन केवळ दोन दिवसांचं होणार असल्याचं सांगितलं आहे.

मात्र या निर्णयामुळे विरोधीपक्ष नेत्यांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांनी या अधिवेशनाच्या मुद्यावरून आता आपली प्रतिक्रिया दिलीये, १४ दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे ठाकरे सरकारला जास्त दिवस आधिवेशन ठेवायला भीती वाटत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. अधिवेशाच्या मुद्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावेळी राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी कोरोनाचं कारण दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! उद्या दुपारी १ वाजता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल होणार जाहीर

News Desk

शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक, पण ते शत्रू नाहीत !

News Desk

राज्यात आणखी काही ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा देण्यासाठी केंद्राकडे मागणी

News Desk