HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसला लाॅटरी लागली पण तिकीटच कोणी फाडत नाही ! सुजय विखेंचा टोला ….

मुंबई | निधी वाटपावरून महाविकासआघाडीमधील काँग्रेसचे आमदार नाराज झाले,अजित पवारांनी त्यांना आश्वासन दिले त्यानंतर काँग्रेस आमदारांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. मात्र काॅंग्रेसच्या या नाराजीवर भाजपने टिकास्त्र सोडले आहे.भाजप खासदार सुजय विखे म्हणतात की , “आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल.”

“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्याचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला विखेंनी लगावला आहे. तसेच “तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात,” असेही सुजय विखे म्हणाले.

“महाराष्ट्राचा विकास थांबेल त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. मंत्री समाधानी आहेत. मात्र आमदार नाराज आहे. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,” अशी भविष्यवाणी खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

News Desk

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

News Desk

पुण्यात नोटाबदलीच्या रॅकेटमधील 5 पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

News Desk