HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे – सुजय विखे

मुंबई | राम मंदिर भूमिपूजनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असं काहींना वाटतं असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवारांच्या या विधानानंतर भाजपाकडून निषेध करण्यात आला होता. यावर आता भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील शरद पवारांनी केलेल्या राम मंदिराच्या विधानावरुन निशाणा साधला आहे.

“राम मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे” असा टोला सुजय विखे यांनी शरद पवारांना लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला सोलापूर दौऱ्यात दिला होता. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असे शरद पवार म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

News Desk

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर यावे, नाहीतर होणार कारवाई! – अनिल परब

Aprna

“दुसऱ्याच्या ताटात काय आहे हे बघण्यापेक्षा आपलं ताट रिकामं आहे ते बघा”, भाजपने राष्ट्रवादीला सुनावलं

News Desk