HW News Marathi
महाराष्ट्र

पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!

पंढरपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. या बाबत वारकर्यांनी सर्वोच्च न्यायालयात पायी वारीसाठी परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हि याचिका फेटाळली आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोना असल्याने वारीला संमती देण्यात आलेली नाही. वारीला संमती मिळावी म्हणून वारकऱ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय?

कोर्टात याचिका फेटाळल्याने अनेक वारकरी नाराज आहेत. कोर्ट नेमकं काय म्हणालं? ‘महाराष्ट्र सरकारने कोव्हिड संकट लक्षात घेऊन वारीवर बंदी घातली आहे. त्यामुळे या वारीला संमती देण्याचा काही प्रश्नच येत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्र सरकारच्या बाजूने आणि वारकऱ्यांच्या विरोधात निकाल दिला आहे. वारीमध्ये गर्दी झाली तर कोरोना वाढण्याचा धोका आहे त्यामुळे याचिका फेटाळण्यात आल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे’.

याचिकाकर्त्यांनी ही बंदी अकारण घातली असल्याचं आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आम्ही कोव्हिडचे सगळे प्रोटोकॉल पाळू आणि मर्यादित स्वरूपात वारी काढू असंही वारकऱ्यांनी म्हटलं होतं. मात्र या वारीला सलग दुसऱ्या वर्षी संमती नाकारण्यात आली आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. आता सुप्रीम कोर्टानेही यासंबंधीची याचिका फेटाळून लावली आहे.

कोर्टात याचिका दाखल

कोरोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने पायी वारीसाठी परवानगी रद्द केली होती. या निर्णयाने अनेक वारकरी नाराज होते आणि काहींनी तर अनोदोलन सुद्धा केलं. वारी संदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारने मोजक्या दहा दिंड्यांनाच परवानगी दिलेली असून, या दिंड्या बसमधून पंढरपुरात दाखल होणार आहेत. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे. विरोधकांकडून निशाणा साधला जात असून, पंढरपूरची वारी आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. ‘पायी वारी’संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

पंढरपुरात संचारबंदी लागू

आषाढी वारी साठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात अली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूर शहर आणि परिसरातील १० गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. करोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावात संचारबंदी लावण्यात येणार आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व ४८ मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आले असून, कुणालाही पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जात नाही. विठ्ठल मंदिर परिसराशी जोडणारे सर्व मार्ग लोखंडी बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आले आहेत. विठ्ठल मंदिर परिसरात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यंदा पंढरपुरात केवळ ४०० वारकरी येणार असले, तरी करोनाच्या धोक्यामुळे ३ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीतील ‘हा’ पक्ष स्वबळावर मैदानात

News Desk

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

swarit

संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गळाभेटीचे कारण काय…?

News Desk