HW News Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon : तेलतुंबडेंवरील गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली | भीमा कोरेगाव हिंसाचार आणि अर्बन नक्सलशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच तेलतुंडे यांना अटक न करण्यासाठी आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली. जामिनासाठी अर्ज करता यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आनंद तेलतुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी(१४ जानेवारी) सुनावणी झाली. यावेळी या प्रकरणाचा तपास मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा स्थितीत गुन्हा रद्द करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तपास सुरु असल्याने याप्रकरणात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले.

गेल्यावर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार आणि नक्षलवाद प्रकरणात तेलतुंबडे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला!” फडणवीसांची मागणी

News Desk

अमित शहांच्या कौशल्याची आम्हीही आतुरतेने वाट बघतोय !

News Desk

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Adil