HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाला सुप्रिया सुळेंचा विरोध

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मास्क, सॅनिटायझर हे फार महत्त्वाचे झाले आहेत. त्याचे उत्पादनही अनेक ठिकाणी होत आहे. दरम्यान, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदूळापासून सॅनिटायझर तयार करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या केंद्राच्या निर्णयाला नापसंती दाखवली आहे. तसेच, त्यांनी या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणीही केली आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी स्वत: ला स्वच्छ ठेवणे आपल्या आजूबाजूच्या वस्तू सॅनिटाईज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामूळे मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. त्याचेच उत्पादन वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामूळेचं तांदळापासून सॅनिटायझर बनवण्याचा विटार केंद्र सरकारने केला. मात्र, देशातील गरीब जनता अन्नासाठी संघर्ष करत आहे. असे असताना अन्नाचा असा वापर करणे अयोग्य आहे. त्यामूळे सरकारने फेर विचार करावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचेच, पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार

News Desk

तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली; निकालाची प्रतिक्षा

Aprna

संभाजीराजेंचे उपोषण सुरू, “सर्व मराठ्यांना एका छताखाली आणण्यासाठीचा हा लढा!”

Aprna