HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना पैसा नको न्याय हवा, सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावरुन प्रीतम मुंडेंनी त्यांचा घेतला समाचार 

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारला खरमरीत टोला लगावला आहे. शेतकरी आंदोलनाला ३० दिवस पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकार ऐकून घेत नसल्याने सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा मान करत नाही. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या संतप्त प्रतिक्रियेवर भाजपच्या नेत्या आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच आहे मात्र त्याच बरोबर पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे, अशा शब्दांत खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. भाजपचे काल (२५ डिसेंबर) राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु होते. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. बीडमधल्या संवाद अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

शेतकरी आंदोलनाला ३० दिवस पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकार ऐकून घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा मान करत नाही. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

“केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे. जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे, असं सांगतानाच देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही”, असं सुप्रिया म्हणाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण नाही!

News Desk

“मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता…”, मनसे साकीनाका प्रकरणावर संतापली

News Desk

कर चुकविणाऱ्‍यांविरोधात जीएसटी विभागाची विशेष मोहीम; २०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

News Desk