HW News Marathi
महाराष्ट्र

“पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी”, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर। स्वाभिमानी शेतकरी संघटना आता अकराकमक होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नृसिंहवाडीत पंचगेगत उडी मारुन जलसमाधी घेऊन असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानीने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते नृसिंहवाडीत पोहोचले. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात होता. पोलिसांनी काही विपरीत घडू नये यासाठी सर्व बंदोबस्त केला होता. तरीही काही कार्यकर्ते पंचगंगा नदीपात्रात जाण्यात यशस्वी झाले. एका शेतकऱ्याने थेट नदीपात्रात उडी घेतली. पण पोलिसांनी त्याला तातडीने बोटीत घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

तसेही मरणार आणि असेही मरणार

शेतकरी संघटनेने काहीही झालं तरी जलसमाधी घेऊच असा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी आम्ही बातचित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मांडली. तसेही मरणार आणि असेही मरणार. त्यापेक्षा हक्कासाठी लढून मरण्यात एक आनंद आहे. आमचं इतिहासात तरी नाव घेतलं जाईल. याशिवाय लढण्याशिवाय हक्काचं मिळणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सरकारला नेमकं किती शेतकऱ्यांना मारायचं आहे?

“सरकारने पूरग्रस्तांच्याबाबत आतापर्यंत निर्णय घेणं आवश्यक होतं. या पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. सरकारने झोपेचं सोंग का घेतलं आहे? राजू शेट्टी यांनी पाच दिवसांपासून पदयात्रा सुरु केली आहे. वेळोवेळी इशारे आणि आंदोलने केली आहेत. सरकारला नेमकं किती शेतकऱ्यांना मारायचं आहे? शेतकऱ्यांना जलसमाधी घ्यायलाच लावायची आहे का, सरकारला किती शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे? हा आमचा सवाल आहे. काहीही झालं तरी शेतकरी जलसमाधी घेतीलच. या सरकारला गुपघे टेकायला आम्ही भाग पाडणारच. कितीही पोलीस बंदोबस्त असला तरीही आम्ही जाणार”, अशी भूमिका तुपकर यांनी मांडली आहे.

“पोलिसांच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे. पण राज्य सरकारकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संपर्क करणं गरजेचं आहे. त्यांनी जाआर काढणं जरुरीचं आहे. तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही. सरकारच्या वतीने जबाबदार माणसाने चर्चा करुन ताबडतोब तोडगा काढणं अपेक्षित होतं. पणा तशा पद्धतीने झालेलं नाही. त्यामुळे आम्ही जलसमाधी आंदोलनावर ठाम आहोत. त्यामुळे त्यांना हे आंदोलन महागात पडणार आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

सामान्यांचा आवाज बुलंद

आमदारकीच्या नावाचं काल-परवा चर्चेत आलेला विषय आहे. पूरग्रस्ताबाबत राजू शेट्टी यांनी अगोदरच मोर्चा काढला होता. चळवळीतल्या लोकांचं काम हे प्रस्तापितांना विरोधात लढणं, सामान्यांचा आवाज बुलंद करणं हे चळवळीतल्या लोकांचं काम असतं. ते काम आम्ही सातत्याने करतो. पण विरोधकांमा आमच्यावर टीका करायची आहे. पण त्याची आम्ही चिंता करत नाहीत, असं देखील रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसुख हिरेन प्रकरण: वसई-विरार मध्ये कुठलाही गुन्हा घडला की माझा संबंध जोडणार का? – धनंजय गावडे

News Desk

‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – अजित पवार

News Desk

स्वार्थापोटी का होईना पण किशोरीताई…; नितेश राणेंचा दिशा प्रकरणावरून महापौरांना टोला

Manasi Devkar