HW News Marathi
महाराष्ट्र

बाप्पासाठी मिठाई घेताय; जरा जपून!

सातारा : गणेशोत्सवात मिठाईला मागणी वाढते. त्यामुळे शेजारील राज्यातून खव्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. त्यामुळे पेढे, बर्फी आदी खरेदी करताना दर्जा तपासूनच घेणे गरजेचे आहे.

म्हणून बाप्पासाठी मिठाई खरेदी करताना, जरा जपून! गणेशोत्सवात खव्याच्या आवकमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त वाढ होते. वाढती मागणी पुरविण्यासाठी या काळात बाहेरच्या राज्यातून भेसळीचा खवा पाठविला जातो. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून झालेल्या कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे. या भेसळीमध्ये केवळ परराज्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील काही लहान-मोठ्या व्यापाºयांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील अनेक नामवंत स्वीटमार्टवर भेसळप्रकरणी यापूर्वी कारवाई झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई यांनी हाती बांधले शिवबंधन

News Desk

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार!

News Desk

रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! भाजपचा सेनेवर वार

News Desk