HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या अजून किती लाटा येणार, सांगू शकत नाही’! –  तात्याराव लहाने

मुंबई | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठे थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.काल देशात जवळपास ३.८ लाख कोरोना बाधित सापडले होते. हा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. राज्यातही ६० हजाराच्या आसपास हा आकडा आहे. मृतांचा आकडादेखील वाढत आहे. यावर टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी यावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले तात्याराव लहाने?

“साथ रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहेे,” असे लहाने म्हणाले.

राज्यात आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ लाखांवर गेली असली तरीही सरकारने ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची योग्य व्यवस्था केलेली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे लपवायचे नाहीत, असे आम्हाला आदेश

देण्यात आले आहेत. तसेच, जर अपघाती मृत्यू झाला आणि तो कोरोनाबाधित असेल तर त्याचा मृत्यू कोरोनाबाधित म्हणूनच दाखवला जातो. कोणतीही लपवाछपवी केली जात नसल्याचे तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रतियांना फुकट सोडणाऱ्या सरकारकडून दलालांमार्फत जनतेची लूट !

News Desk

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणार, राजेश टोपेंची महत्वाची माहिती!

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४७, १९० वर

News Desk