HW News Marathi
देश / विदेश

तेजस्वी यादवच बिहार निवडणूकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’, संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | बिहार विधानसभेचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने आघाडी घेतल्याचं चित्रं होतं, मात्र दुपारनंतर हे चित्रं पालटलं आणि एनडीएने आघाडी घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने सध्या ७७ जागांवर आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रीय जनता दल (राजद) ६५जागांवर आघाडीवर आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जदयू पक्ष तिसऱ्या क्रमांकार आहे. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी एकट्याने भाजप आणि जदयूचा जोरदार सामना करत ६५ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांना त्यांच्या मित्रपक्षांकडून योग्य साथ न मिळाल्याने महागठबंधन बहुमतापासून लांब आहे. परंतु तेजस्वी यादव यांनी केलेल्या संघर्षाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील तेजस्वी यादव यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत केवळ ३०-४० टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. रात्री १०-११ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल. आतापर्यंतचे निकाल एनडीएच्या (भाजप-जदयू) बाजूने लागले आहेत. परंतु मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे, तर राजदच्या तेजस्वी यादव यांनी एनडीएला जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत. तेजस्वी यादव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं पाहिजे कारण, कधी कधी एखादा संघ हरतो, परंतु पराभूत संघातील एक खेळाडू संपूर्ण टीमला पुढे घेऊन जातो, संघर्ष करतो, जिंकण्यासाठी ताकद पणाला लावतो. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या संघर्षामुळे या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? काय म्हणाले नाना पटोले वाचा

News Desk

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री जाणार, पंतप्रधानांचा निर्णय

Aprna

भाजपकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे राजकारण केले जात आहे !

News Desk