HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभरातील मंदिरे अखेर खुली, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तब्बल ९ महिन्यांपासून राज्यातील मंदिरे, तसेच सर्वच प्रार्थना स्थळे बंद होती. मात्र, राज्य सरकारने आजपासून (१६ नोव्हेंबर) अखेर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे, सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे अटी-नियमांचे पालन करून धर्मिकस्थळे खुली राहणार आहेत.

मुंबईचे श्रीसिद्धिविनायक मंदिरही आजपासून भाविकांसाठी खुलं होणार असल्याने मंदिर प्रशासनाकडून रविवारी (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यासाठीच्या अटी-नियमांची माहिती देण्यात आली आहे. तर पुण्यातही श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सद्यस्थितीत गर्दी नियंत्रणात ठेवून मंदिर प्रशासनासह भाविकांनीही जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, याचसोबत शिर्डीचे साई मंदिर खुलं झाल्याने भाविकांनी पहाटपासूनच दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे आई तुळजाभवानी देवीचेही मंदिर तब्बल ८ महिन्यांनंतर खुलं करण्यात आल्याने राज्यभरातून भाविक भल्या पहाटेच तुळजाभवानी मंदिरात दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकची मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना रक्षाबंधनाची अनौखी भेट!

News Desk

‘…म्हणून ईडीसमोर हजर राहू शकत नाही’, अनिल परब यांनी दिलं स्पष्टीकरण

News Desk