HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकराचा अधिवेशनातून पळ, लोकशाहीचा कुलुप ! फडणवीस भडकले

मुंबई | महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होत आहे.या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष भाजपची पत्रकार परिषद झाली.यावेळी विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अधिवेशनातून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे.कोरोनाच्या नावाखाली या सरकरमध्ये लोकशाहीला कुलुप ठोकली जातेय असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

फडणवीसांचे सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाचा कालावधी फक्त २ दिवसांचा ठेवल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.दुसरीकडे या अधिवेशनाच्या दोन दिवसात कोणतेही संसदीय आयुधे न वापरण्यास सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारवर चिडले आहेत. पूर्वी अधिवेशनाचा कालावधी कमी झाला तरी लेखी उत्तर मिळायचे. आता ते मिळणार नाही. उत्तरं का मिळणार नाहीत? अधिकारी काय माश्या मारायला आहेत का?, असा सवाल करतानाच अधिकाऱ्यांना मोकळं रान करून दिलं आहे. प्रश्नच विचारायला कुणी नसल्याने अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायला मोकळं रान करून दिलं आहे,अशी टिका फडणवीसांनी केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत फडणवीस काय म्हणाले ?

विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याने त्याची निवड कधी होणार असा प्रश्न आहे.मात्र सध्या तरी अधिवेशनात अध्यक्षाची निवड होईल असे वाटत नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत, आघाडीतील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी समन्वय नाही. दोन दिवसांत अधिवेशन नरहरी झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली होण्याच्या शक्यता आहे.

सरकार अधिवेशनातून पळ काढतय ,लोकशाहीला कुलुप लावण्याचं काम होतयं

कोविडच्या नावावर लोकशाहीला कुलुप लावण्याचं काम सरकारकडून करण्यात आलं आहे,असा आरोप फडणवीसांनी केला आहे. आम्हाला जेवढे प्रश्न सभागृहात मांडता येईल तेवढे मांडूच. पण सभागृहात प्रश्न मांडता येत नसेल तर आम्ही माध्यमांसमोर येऊन प्रश्न मांडू. रस्त्यावर उतरू, जनतेच्या फोरममध्ये जाऊ आणि प्रश्न लावून धरू. उद्या जर आंदोलन झालं, तर आंदोलन करतोय म्हणून आम्हाला बोलू नका, असंही ते म्हणाले. आम्ही सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू या भीतीने सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे, अशी टीकाही त्यांनी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

केंद्राने मला दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही – चंद्रकांत पाटील 

News Desk

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं ठरलं आहे की १२ नावं बाजूला काढून ठेवायची, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

News Desk