HW News Marathi
महाराष्ट्र

‘आमचा खून झाला तरी लढाई चालू राहिलं’, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते

मुंबई | तमाम मराठा समाजासाठी महत्वाचा विषय असलेल्या मराठा आरक्षणावर आज (५ मे) सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा धक्काच आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात होऊ नये. महाराष्ट्रात होऊ नये. आम्ही होऊ देणार नाही. माझा आणि माझी पत्नी जयश्री पाटीलचा खून झाला, तरी खुल्या गुणवंतांसाठी लढाई चालू राहील. डंके की चोट पर चालू ठेवू. मराठा संघटना, मराठा पोलीस कर्मचारी-अधिकारी जे कोणी एकत्र येऊन आमचा जीव घेण्याच्या मागे लागले आहेत. आमच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र, देश तुम्हाला जाब विचारेल हे लक्षात ठेवा’ असे अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

यावेळी अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. “अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातून येतात. त्या नांदेडमधील मुखेड तालुक्यात मराठा मसल पावर आहे. तिथे प्रेतालाही लाकडं मिळू दिली नाहीत. ७५ टक्के साखर कारखाने तुमच्या मालकीचे आहेत. बँका मालकीच्या आहे. ९० टक्के मेडीकल कॉलेजेस तुमच्याकडे आहेत. पण दडपशाही करुन आरक्षण घेऊ देणार नाही, ही दडपशाही, राजेशाही चालत नाही” असे सदावर्ते यांनी सांगितले. “हा संविधानाप्रमाणे चालणार देश आहे. हा खुल्या वर्गातील गुणवंतांचा विजय आहे” असे सदावर्ते म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणारे अ‍ॅड गुणरत्ने सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. मी आनंदाने या निकालाचे स्वागत करतो. महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंतांनी, ज्या प्रकारे माझं, माझ्या कुटुंबाचं समर्थन केलं. माझ्यामागे शक्ती म्हणून उभे राहिले. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे सदावर्ते निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले आहेत.

“मराठा समाजाचे ५२ मोर्चे झाले. त्यासाठी BMW मधुन गर्दी जमवली. देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला” असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. “ही खुल्या गणुवंतांची संविधानासोबतची लढाई होती. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस घोषित केले” असे विधान गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या आत्महत्येवर मीडियात होणारी चर्चा आश्चर्यकारक, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याकडे मिडियाचे लक्षच नाही

News Desk

सोमय्यांची मुख्यमंत्र्यांविरोधात थेट निवडणुक आयोगाकडे तक्रार

News Desk

वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna