HW News Marathi
महाराष्ट्र

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास सुरुवात

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी(३० डिसेंबर) सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली आहे. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते. ग्रंथदिंडीत अग्रभागी संत गाडगेबाबांच्या वेशातील कार्यकर्ता रस्ता सफाई करीत स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

बैलगाडीवर बसलेली अस्मिता चौधरी ही बहिणाबाईच्या वेशात जात्यावर दळण दळत होती. दिंडीतील पालखीत ठेवलेल्या ग्रंथाचे व संविधानाचे पुजन नगरसेविका संध्या पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी केले. दिंडीत न्यु इंग्लिश स्कुल, बोहरा सेंट्रल, एकलव्य प्राथमिक, द्नानगंगा, खादगाव जि. प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वातंत्र सेनानींच्या वेशभुषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेला हात लावायचा नाही आमचं ठरलेलं आहे-  हसन मुश्रीफ

News Desk

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या-रामदास आठवले

News Desk

धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश!

News Desk
मुंबई

वरळीतील साधना हाऊसमधील आग नियंत्रणात, अग्निशमन दलाचे १२ जवान जखमी

News Desk

मुंबई | वरळीतील साधना हाऊस या कमर्शियल इमारतीला शनिवारी(३० डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे १२ जवान जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवताना श्वसनाचा त्रास झाल्याने हे जवान जखमी झाले असून त्यांना केईएम आणि पोतदार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साधना साधना हाऊसच्या तळमजल्यावरील औषधे आणि रसायणांच्या साठ्याला आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाच्या जवानांनी दिली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी ८ बंब, रुग्णवाहिका पाठवून देण्यात आली. मुंबईमध्ये अग्नीतांडव थांबवण्याचे काही नाव घेताना दिसत नाहीत. शनिवारी सकाळी कमला मिल परिसरातील एका बांधकाम सरू असलेल्या इमारतीस आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वरळीतील साधना हाऊस इमारतीला आग लागली. बारा तासाच्या आत मुंबईतील ही आगी लागण्याची दुसरी घटना घडली होती.

या इमारतीत असलेल्या मेडिकल आणि केमीकलच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली होती. या ठिकाणी औषधे, केमिकल, केबल्स आणि प्लास्टिकचा साठा असल्याने या आगीत मोठा धूर पसरला. यामुळे वरळी परिसरात सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळवताना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने अग्निशमन दलाच्या १२ जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

या आगीमध्ये अग्निशामन दलाचे जवान विशाल विश्वासराव आणि स्वाती सातपुते यांच्यासह धुरामध्ये गुदमरलेल्या ५ जवानांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आग विझविताना अग्निशामन दलाचे जवान विजय मालुसरे, रमेश हिरामन महाले, रमेश बाबर, बालाजी ढगे, राजू लिनार आणि सुबोध पेडणेकर हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोतदार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

Related posts

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk

पुढच्या १ महिन्यात मुंबईतील १५७ पुलांचे ऑडिट सादर करा, महापालिकेचा आदेश

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk