HW News Marathi
Covid-19

देशावर महामारी आणि आर्थिक संकट येणार…काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

बुलडाणा | देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी अक्षय्य तृतीयाच्या दिवशी पुन्हा झाली आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान, देशासह राज्यातील एकूण स्थिती आणि याचा भविष्यातील राजकीय परिस्थिती याबाबतचा अंदाज वर्तवला जातो.यावेळी, कोरोनाच्या संकटामुळे सगळं काही बिथरले आहे.

सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. या भेंडवळच्या भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असते. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे याहीवर्षी बुलडाण्यातील ही प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी शासनाच्या निर्बंधामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच करण्यात येणार असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आता या घट मांडणीतून सांगण्यात आलेले निष्कर्ष पुढे आले आहेत.

भेंडवळच्या घट मांडणीत केलेली महत्त्वाची भाकितं

या भाकितानुसार यावर्षी जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात होणार असून, ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात दिलासा मिळेल. या भाकितामध्ये अशी देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासणार आहे.

देशाच्या राजाची गादी कायम राहणार असून मात्र राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल असं भेंडवळच्या घट मांडणीत सांगण्यात आलं आहे. देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित या घट मांडणीत व्यक्त करण्यात आलं आहे. शिवाय देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव आणि ताण राहणार असून घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील.

शेतकऱ्यांसाठी संंमिश्र भाकित या घट मांडणीत करण्यात आलं आहे. यावर्षी कापूस ,ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे. मात्र तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव राहणार नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे या भाकिताकडे ज्या बाबतीत सर्वांचं लक्ष होत ते म्हणजे यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे. कोरोना सारख्या महामारीतून दिलासा मिळण्याचं यावर्षभरात तरी शक्यता नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज भेंडवळची घट मांडणीच भाकित जाहीर केलं आहे, यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्या प्रमाणावर आहे तर आर्थिक टंचाई सुद्धा भासणार आहे.

नेमकी काय आहे भेंडवळची घटमांडणी?

भेंडवळ इथं होणाऱ्या या घटमांडणी वर शेतकर्‍यांचा विशेष विश्वास आहे. येत्या हंगामात पीक परिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकटे, शत्रूंच्या कारवाया, राजाची गादी टिकणार का? अशा सर्व प्रश्नांबाबत इथं अंदाज व्यक्त करण्यात येतात. हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळला जमतात. मात्र गेली दोन वर्ष शेतकरी आणि इतर लोकांना याठिकाणी जमता येत नाही आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्यसरकार कटीबध्द!

News Desk

जगात कोरोना चाचणी करण्याच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक अव्वल !

News Desk

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

News Desk