HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी हातात मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले!

मुंबई | “मुख्यमंत्र्यांनी हातात मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले आहे.  मुख्यमंत्री ते घड्याळ काढाला सांगा लगेच ते आपल्या दिसतील, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आजू-बाजुला असतील इकडे कुठे तरी, असे ते म्हणाले. राणेंनी आज (२३ डिसेंबर) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या यांच्या अनुपस्थितीवर टीका केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री घड्याळ कधी काढतील, असा सवाल पत्रकारांनी राणेंना विचारल्यावर ते म्हणाले. “घट्याळ लावयाचे कसे, कुठे किंवा लावायचे नाही किंवा आदित्य ठाकरेंसारखे दोनदोन घालयाचे हा त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही. पण राज्याच्या जनतेला आम्हा लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री दिसत नसेल. मग राज्याचा कारभार कसा चालवायाच यांचे तरी आम्हाला उत्तर द्या. कोण चालवतय कारभार, कोण घेते अधिवेशन, कोण उत्तर देतय आमदारांना म्हणजे सगळे हवेत चालेल की काय?, असे अनेक प्रश्न राणेंनी उपस्थित केले आहे. राणे पुढे म्हणाले, “चार्ज देण्याची हिम्मत नाही, ऐवढा विश्वास नाही. तुम्हाला अध्यक्ष पदाची निवडणूक घ्याची नाही. स्वत:चा चार्ज द्याचा नाही. म्हणजे काहीच करायचे नाही. राज्यला आयसीयूमध्ये टाकायचे की काय ?”

“माझ्या ट्वीटमुळे शिवसेनेच्या भावना दुखावल्या असतील. तर पहिल्या हिंदुच्या ज्या भावना शिवसेनेमुळे दुखावल्या आहेत. त्यांनी पहिल्या हिंदूची माफी मागावी,. माझ्या ट्वीटमुळे त्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्या आधी त्यांच्यामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेनेचे जर हिंदुची माफी मागीतली तर मी शिवसेनेची माफी मागायला तयार आहे. त्यांच्या आधी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण का मी ते ट्वी का केले. हे महत्व तुम्हाला कळाले पाहिजे, पहिल्यांदा शिवसेनेने समस्त हिंदुची माफी मागावी. मग माझ्याविरोधात पोलिसात जावे,” राणेंच्या ट्वीट व्हायरल झाले असून शिवसेना यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देना ते म्हटले आहेत. 

भिंडीबाजाराच्या हिंदुत्वातून शिवसेनेने बाहेर पडावे

सामनाच्या अग्रलेखात भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे यावर नितेश राणे म्हणाले, “भाजपचे हिंदुत्व चोरबाजार आहे ना मग शिवसेनेचे हिंदुत्व हे भिंडीबाजारातले आहे. पहिले भिंडीबाजाराच्या हिंदुत्वातून शिवसेनेने बाहेर पडावे. आणि मग आमच्या हिंदुत्वावर बोलावे. अग्रलेखात म्हटले अयोध्यातील सर्व जमिनी भाजपने विकत घेतल्या, पहिले शिवसेनेने ठरवावे. ते हिंदुत्वाच्या बाजुने आहेत की सेक्युलेरिझमच्या बाजुने आहेत. कधी त्यांना सेक्युलेरिझम पाहिजे कधी त्यांना धर्मनिरपेक्ष पाहिजे असतो. कधी ते हिंदुत्वाच्या बाजुने जाता.”  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंवर एनसीबी कार्यालयाबाहेर पुष्पवृष्टी, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सत्कार

News Desk

शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे साधणार संवाद

News Desk

‘सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास कधी सुरू होईल?’, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Ruchita Chowdhary