HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीला, अजित पवार आणि अशोक चव्हाणही असणार उपस्थित

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा ज्वलंत झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने केंद्राने यात लक्ष द्यावे अशी मागणी केली होती. याच मराठा आरक्षणप्रश्नी आज (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

– सकाळी ७ वाजता मुंबईहून विमानाने दिल्लीसाठी रवाना होणार

– सकाळी ९ वाजता दिल्ली विमानतळावर दाखल होणार

– सकाळी ९.४५ वाजता महाराष्ट्र सदन इथे आगमन

– सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवास इथे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक

– बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण

शिवराज्यभिषेकदिनी म्हणजेच ६ जून रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या १६ जून पासून राजर्षि शाहू महाराज यांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या घोषणेनंतर पुढचे पाऊल म्हणजे महाविकासआघाडीने पुन्हा एकदा हा चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला आहे. एकीकडे भाजपकडून रणनिती आखली जाते तर दुसरीकडे महाविकास आघाडी भाजपच्या नेत्यांना भेटून आरक्षणाचा तिढा सोडवण्याची विनंती करणार आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते की, “मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. माझा लढा हा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मराठा समाज हा सामाजिक मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याचं सर्वांनाच दु:ख झालं. आता कोण चुकले कोण बरोबर याच्यावरुन मागचे सरकार आणि आताचे सरकार यांच्यात वाद सुरु आहे. या वादाशी आम्हाला काही घेणं-देणं नाही, मराठा समाजाला आरक्षण कसं देणार ते सांगा?”, त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची मोदींची भेट किती सफल होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय’, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक!

News Desk

मुख्यमंत्र्यांची मनसे कार्यालयाला भेट; पुन्हा मनसे-शिंदे युतीच्या चर्चा

Aprna

‘लखोबा लोखंडे’चं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का?, रुपाली चाकणकरांचा सवाल!

News Desk