HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यापूर्वी केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली. होती. आता राज ठाकरेंच्या घरी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे भाजप-मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेतून हिंदूत्वाचा नारा दिला होता. यावेळी महाविकासघाडीवर सडकून टीका केली होती. परंतु, भाजपला स्पॉफ्ट कॉर्नर दिला होता. 

राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात दानवे विचारल्यावर ते म्हणाले, “काळाच्या पोटात काय सुरू आहे हे सांगणे आता कठीण आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवर विरोधकांच्या पोटात दुखते. जर राज ठाकरे हे पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलले. तर महाविकासआघाडी नेत्यांना डोक्यावर घेते होते. आणि आज त्यांच्यावर टीका करत आहेत. नुकतेच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यात भाजपने चांगले काम केल्यामुळे त्यांना यश आले आहेत. आगामी निवडणुकीच्या भाजप-मनसे युती होणार का?, या प्रश्नावर ते म्हणाले, “राज ठाकरेंनी त्यांच्या परप्रांतीबद्दलाची त्यांची भूमिका धोरण बदले तर युती होण्याची शक्यता नाकरात येत नाही, असे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंचनासाठी महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटींची मदत | नितीन गडकरी

News Desk

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या डिग्रीला किंमत राहील, फडणवीसांचा युवसेनेला टोला

News Desk

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटवर माणिकराव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया 

News Desk